‘नच बलिये 9’मध्ये सध्या काही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सध्या या रिऍलिटी शो चे जज असलेल्या मनिष पॉल आणि रवीना टंडन यांच्यातले भांडण गाजते आहे. मनिषने केलेल्या एका विनोदामुळे रवीना नाराज झाली आणि ती चक्क “नच बलिये 9’मधून निघून गेली.
एका एपिसोडमध्ये मनिष आणि वलुशा डिसोझा हातात एक बोर्ड घेऊन उभे होते. त्यावर “गो बॅक रवीना’ असे लिहीले होते. हे बोर्ड बघून रवीना हादरलीच होती. मनिषला याबाबत विचारले तर “मोबाईल, वेफर्स आणि स्फोटक पदार्थ आणण्यास मनाई आहे.’ असे उत्तर त्याने दिले. रवीना तर मिसाईल आहे, असे अहमद म्हणाला. रवीनाच्या पाठिमागून एक वायर ओढल्याचे नाटक करून “मिसाईल डिफ्युज केले,’ असेही तो म्हणाला. हा विनोद आपल्याला अजिबात आवडला नाही, असे रवीना म्हणाली आणि चक्क उठून निघून गेली.