बुलडाणा – राज्यातील विदर्भ व मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन बुधवार पासून झाले असून या आंदोलनातील शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
या अन्नत्याग आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले रविकांत तुपकर यांची यादरम्यान प्रकृती खालावली आहे. यावरून आता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी बुलडाणा तहसीलदाराची गाडी पेटवून दिल्याने आंदोलनास हिसंक वळण प्राप्त झाले आहे.
दरम्यान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रवीकांत तुपकर यांनी आपल्या राहत्या घरीच आंदोलन पुकारले असून गेल्या चार दिवसांपासून ते अन्नत्याग आंदोलन करत आहे. मात्र आज तुपकरांची प्रकृती खालावली. यावरून शेतकरी व कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी बुलडाणा तहसीलदार यांची गाडी पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.