मुंबई – भारतीय क्रिकेट टिमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत एक मोठ विधान केेल आहे. शास्त्रींच्या मते “15 वर्षे देशासाठी क्रिकेट खेळणाऱ्या धोनीला माहित आहे, की त्याला क्रिकेटला अलविदा कधी म्हणायच आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केलंय त्यानुसार त्याला निवृत्तीबाबत निर्णय घेण्याच अधिकार आहे”, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी धोनीबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे.
पुढे शास्त्री असे ही म्हणाले आहेत की “धोनीला पूर्णपणे माहित आहे की, कधी त्याला ग्लोव्हज काढायचे आहेत, टिम इंडियासाठी 15 वर्षे खेळणाऱ्या खेळाडूला हे नक्कीच माहित आहे की कधी काय करण योग्य ठरेल, जेव्हा धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली होती, तेव्हा धोनी म्हणाला होता की वृद्धिमान सहाला स्किपिंग ग्लोव्हज सोपवण्याची हीच योग्य वेळ होती”.