नवी दिल्ली – विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धेतील क्वार्टर फाइनलचा दुसरा सामना आज दिल्लीत पार पडला. हा सामना कर्नाटक आणि केरळ संघात खेळला गेला. या सामन्यात कर्नाटक संघाने कर्णधार रविकुमार समर्थच्या दमदार दीड शतकाच्या आणि रोनित मोरेच्या भेदक गोलंदाजी जोरावर केरळ संघावर 80 धावांनी विजय मिळवला.
या दुसर्या क्वार्टर फाइनलच्या सामन्याची नाणेफेक जिंकून केरळ संघाने कर्नाटक संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे कर्नाटक संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रविकुमार समर्थने 158 चेंडूत 22 चौकार आणि 3 षटकार खेचत 192 धावांची दीड शतकी खेळी केली.
त्याचबरोबर मागील तीन सामन्यात सलग तीन शतके लगावणार्या देवदत्त पडिकलने 119 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकत 101 धावांची शतकी खेळी केली. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाने 50 षटकांत 3 बाद 338 धावा केल्या. केरळ संघाकडून एन. पी बसिलने 3 गडी बाद केले.
केरळ संघाला विजयासाठी 50 षटकांत 339 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केरळ संघाकडून व्ही गोविंद याने सर्वाधिक धावा करताना 96 चेंडूत 92 धावा केल्या. त्याचबरोबर मोहम्मद अझरुद्दीन 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली.
या व्यतिरिक्त संघातील इतर कोणत्याही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे केरळ संघाने 43.4 षटकात सर्वबाद 258 धावा केल्या. म्हणून केरळ संघाला 80 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. रोनित मोरेने सर्वाधिक 5 गडी बाद केले. त्याचबरोबर के. गौतम आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तसेच प्रसिद्ध कृष्णाने 1 गडी बाद केला.
कर्नाटक संघाने क्वार्टर फाइनलचा दुसरा सामना दुसरा सामना जिंकत मोठ्या दिमाखात सेमी फायनल मध्ये धडक मारली. तसेच सेमी फायनल कर्नाटक दुसरा संघ ठरला. यापूर्वी क्वार्टर फाइनल एकच्या सामन्यात आंध्रप्रदेश संघाचा 117 धावांनी पराभव करून गुजरात संघाने सेमी फायनल मध्ये सर्वात पहिल्यांदा प्रवेश केला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील अजून दोन क्वार्टर फाइनलचे सामने बाकी आहेत.