<p class="query-text-line ng-star-inserted"><strong>Earthquake News :</strong> रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंपाचा हादरा जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली.</p> <p class="query-text-line ng-star-inserted">मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र रत्नागिरी शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती समोर आली आहे.</p> <p class="query-text-line ng-star-inserted">हादरा जाणवल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र या घटनेत कोणतीही जिवीतहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.</p> <p class="query-text-line ng-star-inserted">भूकंपानंतर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रत्नागिरीसह कोकणातील काही भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या झोन ३ आणि झोन ४ मध्ये येतात. त्यामुळे अशा सौम्य धक्क्यांची नोंद अधूनमधून होत असते.</p>