रत्नागिरी – संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या रत्नागिरी जिल्हा बॅक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने आपलं वर्चस्व सिद्ध केल. तर निलेश राणे यांच्या पॅनलचा सुफडा साफ झाला.
रत्नागिरी जिल्हा बँक निवडणूक शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजीराव चोरगे यांनी सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यांना निलेश राणे यांच्या पॅनलच कडवं आव्हान होतं. बँकेंच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनलच वर्चस्व कायम राहिलं.
निवडणुकीत 21 पैकी 14 उमेदवार बिनविरोध होते. तर 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पाच जागा सहकार पॅनलने जिंकल्या. तर विरोधी पॅनलचे दोघं निवडून आले. यामध्ये अजित यशवंतराव आणि मुन्ना खामकर यांचा समावेश आहे.