लखनौ – रेशनकार्डसाठी अपात्र असलेल्या लोकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येत आहेत. अपात्र लोकांनी तहसीलमध्ये जाऊन शिधापत्रिका जमा करावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. अपात्र असलेल्यांनी असे न केल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल, तसेच आतापर्यंत मिळालेल्या रेशनची वसुली होईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गरजूंना रेशन मिळत राहावे, अशा सूचनाही उत्तर प्रदेश सरकारने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यबपीसह
निष्काळजीपणामुळे एखाद्या गरजूचे रेशन बंद झाले, तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, अनेक अपात्र लोक मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत, गरीब आणि गरजू लोक या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे या अपात्र लोकांची शिधापत्रिका जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिधापत्रिकेची तीन स्तरीय तपासणी –
सीएम योगी म्हणाले की, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तीन पातळ्यांवर शिधापत्रिकांची तपासणी करावी. यानंतर अपात्रांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात. दुसरीकडे, एकाही गरजूची शिधापत्रिका रद्द केली जावू नये. जर झालीच तर त्यास अधिकारी जबाबदार असतील. सर्व पात्र लोकांना प्रमाणानुसार रेशन देण्यात यावे, असे सांगितले.
आता कोणाला मिळणार नाही रेशन –
सरकारने जारी केलेल्या सूचनांनंतर, जे पात्र आहेत त्यांनाच मोफत रेशनचा लाभ घेता येणार आहे. ज्यांना त्यांची शिधापत्रिका रद्द करण्यास किंवा सरेंडर करण्यास सांगितले आहे त्यांना यापुढे मोफत रेशनचा लाभ दिला जाणार नाही. या अंतर्गत कोणत्या लोकांना रेशनचा लाभ दिला जाणार नाही ते जाणून घेऊया.
-कुटुंबातील कोणी आयकर भरत असल्यास.
-कुटुंबात चारचाकी वाहन असल्यास (कार पासून ट्रॅक्टर पर्यंत)
– घरात एसी असलेले
– घरात 05 किलोवॅट किंवा त्याहून अधिक जनरेटर असणारे
– 05 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन आहे असे.
– कुटुंबात शस्त्र परवाना असल्यास.
– पेन्शनधारकांसारखे कोणतेही सरकारी लाभ घेत असल्यास.
– कंत्राटी नोकऱ्या असलेले देखील अपात्र आहेत, ज्यांचे उत्पन्न दहा हजार रुपयांच्या पुढे आहे.
– शहरी किंवा ग्रामीण भागात 100 चौरस मीटर पक्के घर बांधलेले नसावे.
– 80 चौरस मीटर एवढी व्यावसायिक जागा असणारे रेशनकार्डसाठी अपात्र ठरतील.
– शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले अपात्र असतील.