नवी दिल्ली – लोककल्याणाच्या कार्यात सतत सहभागी असलेले उद्योग पती रतन टाटा यांना भारत रत्न पुरस्कार द्यावा म्हणून त्यांच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियातून एक मोहीम चालवली आहे. पण ही मोहीम थांबवण्यात यावी अशी सूचना रतन टाटा यांनीच केली आहे.
लोकांनी आपल्या विषयी याद्वारे ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा मी आदर करतो पण आता लोकांनी अशा प्रकारची मोहीम सुरू ठेऊ नये अशी नम्र सूचना आहे असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. या मोहीमेत त्यांच्या चाहत्यांनी भारत रत्न फॉर रतन टाटा हा हॅशटॅग चालवला होता.
तो खूप चर्चेतही आला होता. रतन टाटा हेच भारताचे खरे हिरो आहेत, त्यांनी उद्योग जगताला मानवतेशी जोडून महान कार्य केले आहे अशा स्वरूपाची स्तुती सुमनेही या निमित्ताने त्यांच्यावर उधळली जात होती.
सन 2012 मध्ये त्यांनी टाटा समुहातील टाटा सन्स या कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या ते तरूणांना स्टार्टअप्स सुरू करण्यास प्रोत्साहित करीत आहेत.
While I appreciate the sentiments expressed by a section of the social media in terms of an award, I would humbly like to request that such campaigns be discontinued.
Instead, I consider myself fortunate to be an Indian and to try and contribute to India’s growth and prosperity pic.twitter.com/CzEimjJPp5
— Ratan N. Tata (@RNTata2000) February 6, 2021