चेन्नई : आदित्य तरेच्या शानदार दीडशतकी तर शम्स आणि शशांकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत यजमान तामिळनाडूविरूध्द पहिल्या डावात सर्वबाद ४८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात तामिळनाडूने दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात ३१ षटकात बिनबाद ६६ धावा केल्या असून अजूनही ते ४२२ धावांनी पिछाडीवर आहेत. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सूर्यप्रकाश ११(८५) आणि अभिनव मुंकूद ५२(१०२) धावांवर खेळत होता.
Stumps Day 2: Tamil Nadu – 66/0 in 30.6 overs (Abhinav Mukund 52 off 102, L Suryapprakash 11 off 84) #TNvMUM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2020
तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. मुंबईचा निम्मा संघ १२९ धावांत माघारी परतला होता. मात्र त्यानंतर शम्स मुलाणी आणि आदित्य तरे यांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५५ धावा जोडल्या. आर आश्विनने शम्सला बाद करत ही जोडी फोडली. शम्सने १५८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला तेव्हा पहिल्या दिवसअखेर मुंबईने ६ बाद २८४ अशी मजल मारली होती आणि आदित्य ६९ धावांवर खेळत होता.
आज दुस-या दिवशी पुढे खेळताना आदित्य तरेने शशांकच्या सोबत १२३ धावांची भागिदारी रचत संघाची धावसंख्या ४०० पार नेली. आदित्य तरे कालच्या ६९ धावसंख्येवरून पुढे खेळताना आज दीडशतक साजरा केलं. तरे २५३ चेंडूत १५४ धावा काढून बाद झाला. त्यापाठोपाठ शंशाक ५७ धावांवर बाद झाला तेव्हा मुंबईची ९ बाद ४६५ अशी धावसंख्या होती. त्यानंतर राॅयस्टन डाईसच्या मदतीने तूषार देशंपाडेने संघाची धावसंख्या ४८८ पर्यंत नेली.
End Innings: Mumbai – 488/10 in 148.4 overs (Royston H Dias 6 off 10, Tushar U Deshpande 39 off 55) #TNvMUM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2020
राॅटस्टन ६ धावांवर बाद होताच मुंबईचा डाव आटोपला. तूषार देशपांडे ३९ धावांवर नाबाद राहिला. तामिळनाडू कडून गोलंदाजीत आर साई किशोरने सर्वाधिक ४, आर आश्विनने ३, टी नटराजनने २ आणि अपराजितने १ गडी बाद केला.