गुवाहटी : महाराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेत दुसरा डाव ९ बाद ३६५ धावसंख्येवर घोषित करून आसामसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रत्युत्तरात आसामने तिस-या दिवसअखेर बिनबाद १२ धावा केल्या आहेत. उद्या सामन्याचा अखेरचा दिवस असून आसामला विजयासाठी आणखी २८५ धावांची आवश्यकता आहे.
Stumps Day 3: Assam – 12/0 in 5.6 overs (Subham Mandal 7 off 20, Rahul Hazarika 1 off 16) #ASMvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 21, 2020
महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद १७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आसामने पहिल्या डावात सर्वबाद २४४ धावांपर्यत मजल मारत ६९ धावांची आघाडी घेतली होती.
End Innings: Assam – 244/10 in 78.1 overs (Arup Das 1 off 3, Ranjeet Mali 14 off 16) #ASMvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 20, 2020
यानंतर महाराष्ट्राने जय पांडेच्या १३० धावांच्या जोरावर दुसरा डाव ९ बाद ३६५ वर घोषित करत आसामसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवलं.
Innings break: Maharashtra – 365/9 in 111.3 overs (S S Bachhav 51 off 63, M G Choudhary 0 off 0) #ASMvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 21, 2020
प्रत्युत्तरात तिस-या दिवसअखेर आसामने ६ षटकांत बिनबाद १२ धावा केल्या होत्या. आसामला अजूनही २८५ धावांची तर महाराष्ट्राला १० विकेटची गरज आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा राहुल हजारिका १ आणि शुभम मंडल ७ धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव : सर्वबाद १७५(अंकित बावणे ७५, सत्यजित बच्छाव ४०,अरूप दास ४-६६,रणजित माली ४-५५) आणि दुसरा डाव : महाराष्ट्र : ९ बाद ३६५ वर घोषित : ( जय पांडे १३०, व्ही मोरे ५७, एस बच्छाव ५१, रणजीत माली ५-१२३, अरूप दास २-६९, मुख्तार हुसेन २-९४) विरूध्द आसाम : पहिला डाव : ७८.१ षटकांत सर्वबाद २४४( रूषव दास ९४, शुभम मंडल ३२, रियान पराग २३, सत्यजित बच्छाव ४-४४, मुकेश चौधरी ३-८२, आशय पालकर २-५५) आणि आसाम : दुसरा डाव : ६ षटकांत बिनबाद १२ (राहुल हजारिका १ आणि शुभम मंडल खेळत आहे ७ ).