बारामती(पुणे) : येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरील शुभारंभाच्या रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर ६७ धावांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिध्द केले आहे.
Maharashtra Won by 67 Run(s) #MAHvCAU @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/PHdwm7ldgp
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 15, 2020
विजयासाठी उत्तरखंडला दुस-या डावात २७० धावा करणे गरजेचे होते. मात्र त्यांचा संघ २०२ धावाच करू शकला. इलाईट फेरीच्या ग्रुप सी मधल्या या सामन्याच्या पहिल्या डावात महाराष्ट्राने सर्वबाद २०७ तर दुस-या डावात सर्वबाद ३१३ धावा केल्या होत्या.
उत्तराखंडने पहिल्या डावात २५१ धावा करून महाराष्ट्रावर आघाडी घेतली होती. मात्र, विजयासाठीचे २६९ धावाचे आव्हान त्यांना पेलवले नाही.
तिस-या दिवसअखेरच्या २ बाद १०३ धावांवरून उत्तराखंडने आपला दुसरा डाव पुढे सुरू केला. मात्र, महाराष्ट्राचा आशय पालकर आणि सत्यजित बच्छाव यांच्या अनुक्रमे ४४ धावांत ३ आणि ४९ धावांत ३ विकेट्सच्या बळावर महाराष्ट्राने वर्चस्व राखले. त्यांना मुकेश चौधरी आणि प्रदीप दाढे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत उत्तम साथ दिली.
उत्तराखंडच्या कमल सिंगच्या ५१, दिक्षांशु नेगीच्या ३८ धावा उल्लेखनीय ठरल्या. शतकवीर कमल सिंग सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव : २०७.( आशय पालकर ६०, विशांत मोरे ५९, अग्रीम तिवारी ३/४९) आणि दुसरा डाव : ३१३ सर्वबाद ( सत्यजित बच्छाव ६७, अंकित बावणे ६१, सनी राणा ७/४३) वि. उत्तराखंड पहिला डाव : २५१( कमल सिंग १०१, सौरभ राव ४९, सत्यजित बच्छाव ४/४९) आणि दुसरा डाव : २०२ ( कमल सिंग ५७, दिक्षांशु नेगी ३८, आशय पालकर ३/४४). सामनावीर : कमल सिंग; महाराष्ट्र ६७ धावांनी विजयी.