पुणे : यजमान महाराष्ट्राची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आजपासून नागोठाण्यात झारखंडशी चारदिवसीय लढत सुरू झाली आहे. महाराष्ट्राने अझीम काझी आणि विशांत मोरे यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या दिवसअखेर ८९ षटकांत ५ बाद २२७ अशी मारली आहे.
Stumps Day 1: Maharashtra – 227/5 in 88.6 overs (S S Bachhav 5 off 19, A N Kazi 70 off 163) #MAHvJHA @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 11, 2020
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. महाराष्ट्राची सुरूवात चांगली झाली नाही आणि अवघ्या ४.५ षटकांत ५ धावांत त्याचे दोन फलंदाज माघारी परतले होते. राहुल शुक्लाने जय पांडे शून्यावर त्रिफळाचित करत महाराष्ट्राला पहिला तर अजय यादवने राॅयरवी नौशाद शेखला १ धावेवर झेलबाद करत दुसरा धक्का दिला.
WICKET! Over: 40.1 A R Bawane 37(100) ct Sumit Kumar b Utkarsh Singh, Maharashtra 88/5 #MAHvJHA @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 11, 2020
त्यानंतर ठराविक धावसंख्येच्या अतंरावर महाराष्ट्राचे तीन फलंदाज स्वप्निल गुगळे (२५), यश क्षीरसागर (११), अंकित बावणे (३७) धावांवर बाद झाल्याने महाराष्ट्राची ४०.१ षटकांत ५ बाद ८८ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर अझीम काझी आणि विशांत मोरे यांनी अर्धशतके झळकावित महाराष्ट्राचा डाव सावरत संघाची धावसंख्या २०० पार नेली. पण त्यानंतर दुखापतीमुळे ६७ धावांवर विशांत मोरे रिटायर्ड हर्ट झाला.
पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने ५ बाद २२७ धावांपर्यंत मजल मारली अाहे. झारखंडकडून गोलंदाजीत राहुल शुक्ला आणि उत्कर्ष सिंगने प्रत्येकी २ तर अजय यादवने १ गडी बाद केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सत्यजित बच्छाव ५ आणि अझीम काझी ७० धावांवर खेळत होता.