पुणे : अझिम काझी आणि विशांत मोरे यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात यजमान महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरूध्द सर्वबाद ४३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडने पहिल्या डावात फलंदाजीस सुरूवात केली असून दुस-या दिवसअखेर १ षटकांत २ बाद २ धावा केल्या आहेत. झारखंड अजूनही ४३२ धावांनी पिछाडीवर आहे.
Stumps Day 2: Jharkhand – 2/2 in 0.6 overs (Utkarsh Singh 2 off 2, Md Nazim 0 off 0) #MAHvJHA @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2020
झारखंडची पहिल्या डावात सुरूवात चांगली झाली नाही आणि २ धावांवर त्याचे दोन फलंदाज माघारी परतले. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकांतील चौथ्या चेंडूवर कुमार देवरतला शून्यावर आणि शेवटच्या चेंडूवर उत्कर्ष सिंगला २ धावेवर बाद करत माघारी धाडले. त्यानंतर पंचानी दुस-या दिवसाचा खेळ थाबंविला. खेळ थांबला तेव्हा नुकताच फलंदाजीस आलेला एमडी नाझिम शून्यावर खेळत होता.
End Innings: Maharashtra – 434/10 in 172.3 overs (A Palkar 18 off 120, M G Choudhary 16 off 30) #MAHvJHA @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2020
तत्पूर्वी, महाराष्ट्राने पहिल्या डावात १७२.३ षटकांत सर्वबाद ४३४ धावा केल्या आहेत. महाराष्ट्राकडून अझीम काझीने ३४९ चेंडूत सर्वाधिक १४० तर विशांत मोरेने २७४ चेंडूत १२० धावांची खेळी केली. अंकित बावणेने ३७, मनोज इंगळनेे २९ आणि स्वप्निल गुगळेने २५ धावा केल्या.
Utkarsh Singh 5 WICKETS! (48.0-14-108-5), Maharashtra 372/8 #MAHvJHA @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2020
झारखंडकडून उत्कर्ष सिंगने ५३ षटकांत १३० धावा देत सर्वाधिक ५ आणि राहुल शुक्लाने २८.३ षटकांत ६३ धावा देत ३ गडी बाद केले. तर, अनुकुल राॅय आणि अजय यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला.