रोहतक : हरियाणाच्या ४०१ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात महाराष्ट्राची ४ बाद ८८ अशी बिकट अवस्था झाली आहे. महाराष्ट्र संघ हरियाणा संघापेक्षा अद्याप ३१३ धावांनी पिछाडीवर आहे.
Stumps Day 2: Maharashtra – 88/4 in 43.6 overs (N S Shaikh 23 off 79, S S Bachhav 5 off 13) #HARvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 10, 2019
आज दुस-या दिवशी पहिल्या सत्रात हरियाणाचा पहिला डाव १२४.२ षटकात ४०१ धावावर संपुष्टात आला. हरियाणाकडून शुभम रोहिलाने सर्वाधिक १४२ आणि शिवम चौहानने ११७ धावा केल्या. महाराष्ट्रकडून गोलंदाजीत अनुपम संकलेचाने सर्वाधिक ४ तर एस बच्छावने ३ गडी बाद केले.
End Innings: Haryana – 401/10 in 124.2 overs (S P Kumar 40 off 86, A H Hooda 0 off 5) #HARvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 10, 2019
प्रत्युत्तरात महाराष्ट्राची सुरूवात खराब झाली. केवळ ७७ धावांत महाराष्ट्राचे चार फलंदाज माघारी परतले. सलामीवीर स्वप्निल गुगळे २१ आणि रूतुराज गायकवाड ७ धावावर बाद झाले. त्यानंतर चिराग खुराणा १७ व राहुल त्रिपाठी ८ धावावर तबूंत परतले. हरियाणाकडून गोलंदाजीत टिंटू कुंडूने २ तर हुड्डा आणि पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नौशाद शेख २३ आणि एस बच्छाव ०५ धावांवर खेळत होता.