सूरत : रणजी स्पर्धेत ‘अ’ गटातील सामन्यात गुजरातने केरळचा ९० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरातने आपल्या खात्यात ६ गुण दमा केले आहेत. चिंतन गजा हा सामनावीर ठरला.
Gujarat Won by 90 Run(s) #GUJvKER @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/1NyYeN7Rj6
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 27, 2019
गुजरातने दुस-या डावात सर्वबाद २१० धावा करत केरळसमोर विजयासाठी २६८ धावांचे आव्हान ठेवले होते.मात्र गुजरातच्या अक्षर पटेलच्या ४ आणि चिंतन गजाच्या ३ बळीच्या जोरावर केरळचा संघ १७७ धावांतच गारद झाला. केरळकडून संजू सॅमसन याने ७८ धावांची खेळी करत एकतर्फी झुंज दिली पण तो विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला.
तत्पूर्वी, केरळाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारताना गुजरातला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होत. गुजरातने पहिल्या डावात सर्वबाद १२७ धावा केल्या होत्या. केरळकडून जलाज सस्केना याने पहिल्या डावात २६ धावा देत ५ गडी बाद केले होते.
प्रत्युत्तरात केरळचा पहिला डाव अवघ्या ७० धावांत आटोपला होता.
End Innings: Kerala – 70/10 in 35.5 overs (Asif K M 0 off 9, Warrier 0 off 1) #GUJvKER @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 25, 2019
केरळचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले होते. गुजरात कडून पहिल्या डावात गोलंदाजीत कलारीयाने सर्वाधिक ४ तर अक्षर पटेलने ३, चिंतन गजाने २ आणि देसाईने १ गडी बाद केला.