कानपुर : यूपी आणि तामिळनाडु दरम्यान आजपासून कानपूरमधील ग्रीनपार्क येथे रणजी करंडक स्पर्धेतील चौथा सामना सुरू होणार होता. पण, गुरूवारी झालेल्या पावसामुळे मैदान मोठ्या प्रमाणात ओले झाल्याने आज पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.
सामन्याचे पंच अजय वर्मा, पिच क्युरेटर सुजान मुखर्जी यांनी मैदानाचे निरीक्षण केले, त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, यूपी संघाला याचा फायदा होऊ शकतो कारण यूपी संघाचे ९ गुण असून ते चौथ्या स्थानी आहेत आणि तामिळनाडुचा संघ १ गुणांसह १६ व्या स्थानी आहे.