पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने छत्तीसगडविरूध्दच्या रणजी सामन्यातील पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ६ बाद २३८ धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत सुरू आहे.
Stumps Day 1: Maharashtra – 238/6 in 77.6 overs (V V More 49 off 101, S S Bachhav 12 off 23) #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 25, 2019
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. याही समान्यात महाराष्ट्राची सुरूवात खराब झाली. संघाची धावसंख्या ४७ असताना तीन फलंदाज माघारी परतले होते.यामध्ये ट्रंकवाला १०, नौशाद शेख १२ आणि केदार जाधव १२ धावांवर बाद झाले. अनुभवी फलंदाज केदार जाधवने अपेक्षेप्रमाणे खेळी केली नाही.
त्यानंतर ऋतुराजने अंकित बावणेसोबत डाव सावरत चौथ्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. बावणे २० धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला खुराणा ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने मोरे सोबत सहाव्या विकेटसाठी ७९ धावांची भागिदारी करत धावसंख्या २०० पार नेली. ऋतुराज गायकवाडने १९९ चेंडूत १०८ धावांची खेळी केली.
WICKET! Over: 69.1 R D Gaikwad 108(199) ct Avnish Singh b Ajay Mandal, Maharashtra 207/6 #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 25, 2019
छत्तीगडकडून गोलंदाजीत वीरप्रतापसिंगने सर्वाधिक ४ तर पुनीत दाते आणि अजय मंडलने प्रत्येकी १ गडी बाद केला. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने ७८ षटकात ६ बाद २३८ मजल अशी मारली असून खेळ थांबला तेव्हा व्ही मोरे ४९ आणि सत्यजित बच्छाव १२ धावांवर खेळत होता.