चेन्नई : यजमान तामिळनाडूने रणजी करंडक स्पर्धेत मुंबईविरुध्दच्या सामन्यात तिस-या दिवसअखेर पहिल्या डावात ७ बाद २४९ अशी मजली मारली आहे. तामिळनाडू अजूनही २३९ धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद ४८८ धावा केल्या आहेत.
#TNvMUM in Chennai | Stumps, Day 3
R Ashwin & Sai Kishore's fighting partnership of 54* (from 194 balls) helped TN to stumps on Day 3.#RanjiTrophy pic.twitter.com/pls7T8bcsD
— TNCA (@TNCACricket) January 13, 2020
कालच्या बिनबाद ६६ वरून पुढे खेळताना तिस-या दिवशी तामिळनाडूने ७ गडी गमावत कालच्य् धावसंख्येत १८३ धावांची भर घातली. संघाची धावसंख्या ७६ असताना अभिनव मुंकूद ५८ धावांवर बाद झाला. त्यानंतर सुर्यप्रकाश आणि कौशिकने दुस-या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या. सूर्याप्रकाश ४१ वर बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या १७८ असताना तामिळनाडूने तीन फलंदाज ( अपराजित १४, कौशिक ६०, प्रदोष पाॅल ० )गमावल्याने त्यांची ५ बाद १७८ अशी अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर तामिळनाडूच्या राॅयस्टोनने फलंदाज इंद्रजितला ६ आणि दिनेश कार्तिकला ७ धावांवर बाद करत तामिळनाडूची ७ बाद १९५ अशी स्थिती केली. तिस-या दिवशी पहिल्या डावात तामिळनाडूच्या राॅयस्टोन, तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी २ तर भौईरने १ गडी बाद केला.
त्यानंतर आर आश्विन आणि आर साईकिशोर यांनी संघाचा डाव सावरत आणखी पडझड होऊ न देता तिस-या दिवसअखेर ७ बाद २४९ अशी मजल मारून दिली. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आर आश्विन ३२(९६) आणि साईकिशोर १७(११४) धावांवर खेळत होता.
#ranjitrophy, runs,tamilnadu, cricke