धर्मशाळा : युवा फलंदाज सर्फराज खानच्या नाबाद व्दिशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सातव्या फेरीच्या सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३७२ धावा अशी मजल मारली आहे.
Stumps Day 1: Mumbai – 372/5 in 74.6 overs (S N Khan 226 off 213, Shubham Ranjane 44 off 75) #HPvMUM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2020
हिमाचल प्रदेश नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या दिवसअखेर ७५ षटकांत ५ बाद ३७२ अशी मजल मारली आहे. पहिल्याच दिवशी मुंबईची अवस्था ४ बाद ७१ अशी झाली होती. पण त्यानंतर सर्फराजने अादित्य तरे सोबत डाव सावरत पाचव्या विकेटसाठी १४३ धावा जोडल्या. आदित्य तरेनी ६२ धावांची खेळी केली. त्यानंतर पुन्हा सर्फराजने शुभम राजणेसोबत १५८ धावांची भागिदारी रचत संघाची धावसंख्या दिवसअखेर ३७२ पर्यंत नेली.
हिमाचलकडून राघव धवन आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी २ तर के डी सिंगने १ गडी बाद केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सर्फराज खान २२६ (२१३) आणि शुभम राजणे ४४(७५) धावांवर खेळत होता.
सर्फराजचे सलग दुसरे व्दिशतक
DOUBLE HUNDRED: There's no stopping Sarfaraz Khan! 👏👏
He has now crossed the 200-run mark in two successive innings in this @paytm #RanjiTrophy season. 👌👌
Follow it live 👉👉 https://t.co/OljC14skZn#HPvMUM pic.twitter.com/g3DqKFytxO
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2020
सर्फराजने आजच्या सामन्यात १९९ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. सर्फराजचे रणजी स्पर्धेत हे सलग दुसरे द्विशतक ठरले. गेल्याच सामन्यात सर्फराजने उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद ३०१ धावांची खेळी केली होती.