भोजपुरी ऍक्ट्रेस राणी चॅटर्जी तिच्या बिनधास्त भूमिकांमुळे लोकप्रिय आहे, तशीच ती तिच्या सडेतोड वक्तव्यांबद्दलही प्रसिद्ध आहे. जेव्हापासून करोनाची दुसरी लाट आली आहे, तेव्हापासून सर्व सेलिब्रिटी लोकांना लस टोचून घेण्याचे आणि एकमेकांना मदत करण्याचे आवाहन करत आहेत. कारण संसर्ग प्राणघातक असू शकतो.
यामुळे कित्येकजणांना जीव गमवावा लागला आहे. हे पाहून राणी व्यथित झाली आहे. लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, आपल्याला लस घेण्यासाठीची अपॉइंटमेंट मिळत नसल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या घरात एकूण 7-8 लोक आहेत आणि त्यांना लस देण्याची जबाबदारी राणीवर येऊन पडली आहे.
जेव्हा अपॉईंटमेंट मिळेल, तेव्हा या सर्वांना ती लस देणार आहे. आपल्या देशातील आरोग्य सुविधा एवढी तणावाखाली कशी आली. ऑक्सिजन मिळत नाही, लस मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही. असे कसे झाले. पूर्वी तर असे काही होत नव्हते. मग एवढा ताण जाणवण्याइतके काय झाले, असा प्रश्न राणीला पडला आहे. राणी चॅटर्जीच्या नावावर भोजपुरीतील सुमारे 400 सिनेमे आहेत.