मुंबई – आलिया भट आणि रणबीर कपूर नुकतेच करोनामधून बरे झाले आहे. त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे. पण विश्रांती घेण्याऐवजी ही जोडगोळी मालदीवला रवाना झाली आहे. या दोघांना अलीकडेच विमानतळावर एकत्र बघितले गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या कुटुंबीयांसह हे दोघेजण रणथंबोर जंगलामध्ये फिरायला गेले होते.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला या दोघांनाही करोनाचे इन्फेक्शन झाले होते. आता ते बरे आहेत. पण लगेच मालदीवला फिरायला जाण्याची गरज काय होती. मालदिवला करोनाचा संसर्ग नसेल का? या मुद्दयावरून त्यांच्या फॅन्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
आलिया आणि रणबीर दोघेही आयान मुखर्जींच्या “ब्रम्हास्त्र’मध्ये एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाच्या सेटवर हे दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असे बोलले जात आहे.