मुंबई – लोकसभा निवडणुक संपताच शिवसेनेने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. शिवसेनेला विधानसभापूर्वी ‘राम मंदिराची’ आठवण होऊ लागली आहे. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून ‘रामाचे काय होईल’ असा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात लिहिले आहे की, ‘काँग्रेस राज्यात राम अंधारात होते. अयोध्येत दिवाळी साजरी करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले होते?’’ असा कडक सवाल पंतप्रधान मोदी यांनी काशीला जाऊन विचारला. प्रश्न खरा आहे. अयोध्येत आता दिवाळीच होईल. रामाचे काम अयोध्येत आणि देशात सर्वत्र होईल. हाच जनादेश आहे.’
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळून झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा राम मंदिराचा उल्लेख केला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्या राम मंदिरासंबंधी सूचक विधान केले होते की, ‘रामाचं काम करायचं आहे. आणि ‘रामाचं काम होणारच’, असेही वक्तव्य त्यांनी केले होते.