कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराने फटका बसलेल्या पूर बाधित क्षेत्राला आज केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी आठवले म्हणाले, त्यांनी पूरबाधित क्षेत्राचा आराखडा नव्याने करण्याची गरज असल्याचे सांगत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्थांच्या मदतीसाठी खासदार फंडातून दोन्ही जिल्ह्याला प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
तसेच पूर बाधित नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं देखील आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.