मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख आणि खासदार रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सूर काढला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार करोना नियंत्रण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या 54 हजारांहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र अगदी करोनामय झाला आहे. मुंबईत देखील तीच परिस्थिती आहे. या करोनाचा सामना करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार करोनाचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्वाधिक 1 हजार करोना मृत्यू मुंबईत झाले आहेत.