मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भावनिक आवाहन देखील बंडखोर आमदारांचे मत परिवर्तन करण्यात अपयशी ठरल्याचं चित्र आहे. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आता सेनेच्या ३७ आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जात असून ते लवकरचं भाजपसोबत सत्तास्थापनाचा प्रस्ताव राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधे सध्या ३७ या आकड्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
अशातच रामदास आठवले यांनी या राजकीय नाट्यावर पत्रकरांशी बोलतांना आपल्या शैलीत कविता केली आहे. “एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे आत राहिले नाहीत अजिबात अंधे, म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत. एकनाथ शिंदे” अशी कविता करत एकनाथ शिंदे भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याचा दावा आठवलेंनी केला आहे.
दरम्यान, सांगलीतील मिरजच्या म्हैसाळ येथील दलित समाजाचे डॉ.माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन सख्ख्या भावांच्या सर्व कुटुंबीयांनी राहत्या घरी सामूहिक आत्महत्या केली त्या घटनास्थळी आठवले यांनीभेट दिली. यावेळी पत्रकरांशी बोलतांना त्यांनी एकनाथ शिंदे भाजपसोबत येणार असल्याचा दावा केला आहे.