मुंबई – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता टप्प्याटप्याने देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु, सर्वधर्मीय प्रार्थनस्थळे अद्यापही भाविकांसाठी बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
रामदास आठवले म्हणाले कि, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, देरासर, सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत. तसेच मास्क सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून राज्यात सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.
मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा बुद्धविहार देरासर सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत. त्यासाठी मास्क सॅनिटायझर ;फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळून राज्यात सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी मा. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठविले आहे.@CMOMaharashtra@BSKoshyari
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) August 25, 2020
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी मुंबईतील तीन जैन मंदिरांमध्ये पर्युषण पर्वानिमित्त प्रार्थना करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. कोविड-19 ला नियंत्रित करण्याच्या हेतूने निश्चित करण्यात आलेल्या आदर्श कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करून प्रार्थना करण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती.