मुंबई : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाल्याने लोकांच्या मनोरंजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जनतेच्या मनोरंजनासाठी 90च्या दशकांत अफाट लोकप्रिय असणाऱ्या महाभारत, रामायण अणि सर्कस या मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
90 च्या दशकात महाभारत आणि रामायन या मालिका रविावारी सकाळी लागत असत. त्यावेळी रस्ते अगदी निर्मनुष्य असत. पण आता निर्मनुष्य रस्तयांमुळे घरात राहणाऱ्यांच्या या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रामायणचे प्रक्षेपण आज पासून सुरू झाले.
नियोजनानुसार रामायणसोबत यश चोप्रा दिग्दर्शित महाभारत मालिकेचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणारआहे. सध्या बॉलिवूडचा सुपरस्टार असणाऱ्या शाहरूख खानला पडद्यावर आणणाऱ्या सर्कस मालिकेचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर युट्यूबवर वागळे की दुनिया आनि बुनियाद या मालिका पुन्हा टाकण्यात येणार असल्याचे समजते. तेंव्हा या मालिका पाहण्याचा आनंद घ्या आणि त्यासाठी घरात रहा. त्यातून कोरोनापासून वाचाल हा यावरचा बोनसच!