नगर – हिंदू समाजाने 500 वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. प्रभुरामचंद्र पुन्हा धर्तीवर आज अवतारणार आहे. त्यामुळे देशात पुन्हा रामराज्य येणार आहे. याचा प्रत्तेक हिंदूला आनंद होत आहे. 500 वर्षाच्या या लढ्यात शेकडो हजारोंना हौताम्य आले आहे. त्यांच्या आत्म्याला आज सद्गती प्राप्त होईल.
आज झालेल्या भूमिपूजन सोहळ्यामूळे सर्वत्र भगवे वातावरण झाले आहे. करोडो भाविकांच्या भावना असलेले अयोध्येतील हे राम मंदिर संपूर्ण जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी केले.
अयोध्येत होत असलेल्या प्रभूरामचंद्राच्या भव्य मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त नगर शहरात सर्वत्र उत्सहात व भक्तिपूर्ण वातावरणात विविध कार्याक्रमंचे आयोजन करण्यात आले होते. गौरीशंकर मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालया समोर उभारण्यात आलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य मूर्तीचे पूजन व महाआरती करण्यात आली. माजी नगरध्यक्षा लता लोढा व वसंत लोढा यांच्या हस्ते महाआरती झाली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी रा.स्व.संघाचे शहर सह संघचालक वाल्मिक कुलकर्णी, शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, भाजप शहराध्यक्ष महेंद्र गंधे, कमलेश वैकर, एल.जी. गायकवाड आदींसह भाविक उपस्थित होते