मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या विषयाचा दि एन्ड होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
अद्यापही या प्रकरणाची चौकशी सुरूच असून या विषयाला आता राजकारणानेही वेढा घातला आहे. या प्रकरणात सुरुवातीला हिंदी चित्रपट सृष्टीतील घराणेशाही आणि कंपूशाही या विषयावर चर्चा झाली. याच मुद्यावरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत अर्णब गोस्वामीवर निशाणा साधला आहे.
The fact that he is making all of us #AdityaChopra , @karanjohar , @MaheshNBhatt @iamsrk @BeingSalmanKhan and many many others in the industry look like we are criminals rapists etc it’s better we don’t act like one by hiding and come out to face him like a man
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 3, 2020
वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी आणि ते संपादक असलेल्या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्यात यावी असा सल्ला आदित्य चोप्रा, शाहरुख खान आणि सलमान खान ,करण जोहर, महेश भट्ट,यांच्यासह अनेकांना राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत दिला आहे.
ते पुढे म्हणाले, वृत्तवाहिनीच्या चर्चात्मक कार्यक्रमादरम्यान ते आपल्याविषयी असं दाखवतायेत जसं काय आपण गुन्हेगार आहोत..बलात्कारी आहोत. त्यामुळे अशा काळात या लोकांचा थेट सामना करण्याची गरज आहे”. असं ट्विट करत आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सुशांत आत्महत्याप्रकरणी वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामीला खलनायक म्हणत ताशेरे ओढले आहेत.