पाटणा – एबीपी सी व्होटर्स यांनी घेतलेल्या निवडणूकपूर्व अंदाजात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सर्वाधिक जागा या भाजपाला मिळतील आणि सर्वाधिक मते ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवडणुकीत चिराग पास्वान हे फारसा प्रभाव पाडू शकणार नाहीत, असे भाकीत करण्यात आले आहे. तिसऱ्या पक्षाची फारशी चलती नसल्याने महाआघाडी आणि रालोआ यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. मतदानाची टक्केवारी आणि कंसात विजयी उमेदवारांची अपेक्षित संख्या
मगध भोजपूर विभाग (69जागा)
रालोआ – 44% (36 ते 44 जागा),
महाआघाडी – 33% ( 23-39 जागा)
लोकजनशक्ती पक्ष -4% (0-0 जागा)
अन्य – 19% ((2-3 जागा)
मिथिलांचल विभाग
रालोआ – 41% (27 ते 31)
महाआघाडी – 38 % (18 ते 21 जागा)
लोकजनशक्ती पक्ष – 4% (1-3जागा)
अन्य – 17% (0-1 जागा)
अंग प्रदेश विभाग (27जागा)
रालोआ – 16 ते 20 जागा
महाआघाडी – 6 ते 10 जागा
लोकजनशक्ती पक्ष – 0-2 जागा
अन्य – 0-1 जागा
मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता रालोआ 28 टक्के मते मिळवतील. तर राष्ट्रीय जनता दल 46 टक्के मते मिळवतील. चिराग पास्वान यांचा लोकजनशक्ती पक्ष चार टक्के मते मिळवण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने आघाडी सत्तेवर आल्यास नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्ट केले आहे. मात्र भारतीय जनता पक्ष हा संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळवण्याची शक्यता या सर्वेक्षणातील निष्कर्षात व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील सत्ताधारी महाआघाडीला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने आव्हान दिले आहे. बिहारमध्ये 243 विधानसभांच्या जागांसाठी 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेबर या काळात मतदान होणार आहे.