पुणे, दि. 5 -महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित कै. जडावबाई नारायणदासजी दुगड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी राख्या आणि भेटकार्ड तयार केल्या आहेत.
शाळेत दरवर्षीप्रमाणे राखी आणि भेटकार्डसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापिका वंदना कुंजीर, कलाशिक्षक भागूजी शिखरे, विकास दळवी, सोनावले हेमलता, प्रजोत आबनावे, शाहीन शेख, दत्तात्रय पवार, मीना मते,सौ.कुंभार, महेश राऊत, कांबळे नयन राऊत आदी उपस्थित होते.
अमृतमहोत्सवानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी “हर घर झेंडा’अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. तिरंगा ध्वज व जनजागृतीपर फलक यावेळी विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. “हर घर झेंडा’हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन जनजागृती केली. स्वातंत्र्यदिनापर्यंत शाळेमध्ये स्फूर्तीगीत, चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व अशा स्पर्धा राबविण्यात येणार आहे. कलाशिक्षक भागूजी शिखरे यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते.