कोल्हापूर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने शेती संदर्भात मंजूर केलेल्या विधेयकांविरोधात आवाज उठवण्यासाठी विविध राज्यांतील शेतकरी संघटनांनी दिल्ली गाठली आहे. दरम्यान, दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्याला रोखण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त करण्यात आला असून यामुळे शेतकरी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पाहायला मिळतोय.
अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. याबाबत बोलताना शेट्टी यांनी, “आज राजरोसपणे अतिरेकी भारतभर फिरत आहेत, तुमची हिम्मत नाही चीनला घुसखोरी का केली असं विचारायची, केंद सरकारने तिथं मर्दानगी दाखवावी” असा सल्ला दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते
दरम्यान, केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांविरोधात बाळाचा वापर करण्यात येत असल्याचा शेट्टी यांनी तीव्र निषेध नोंदवला. ‘केंद्र सरकार निशस्त्र, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पायी निघालेल्या शेतकऱ्यांना त्रास देत आहे. त्यांना क्रूर वागणूक देत आहे. यात कसली आली मर्दानगी?’ असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला.