कोल्हापूर(प्रतिनिधी) – मुळामध्ये विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानीला द्यायची म्हणजे काही दया नाही किंवा मेहरबानी नाही… स्वाभिमानी पक्ष अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात समझोता झाला होता. आणि समझोता 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी झालेला होता.
दिल्लीमध्ये पवार साहेबांनी त्या बैठकीमध्ये होतो आणि आम्ही दोघांनी ठरवलं होत. मात्र गेल्या सव्वा वर्षात मी या राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागांसाठी कोणालाही भेटलो नाही…फोन केला नाही किंवा माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी विचारणा केली नाही.
सध्या मला पूरग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन महत्त्वाचा आहे आणि विधान परिषदेवर ती जाणं हा आमची औपचारिक बाब आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.