नवी दिल्ली – महात्मा गांधी यांनी केलेल्या सुचनेनुसारच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटांशांकडे माफीची याचना केली होती असा जो दावा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे तो धादांत खोटा आहे असे प्रतिपादन कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी केला आहे.
एका संकेत स्थळावर त्यांनी याचे सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की सावरकर यांनी ब्रिटीशांना पहिले माफी पत्र सन 2011 साली आणि दुसरे माफीपत्र सन 2013 साली लिहीले आहे आणि महात्मा गांधी दक्षिण अफ्रिकेतून सन 2015 साली भारतात परत आले आहेत. त्यामुळे सावरकरांनी लिहीलेले माफी पत्र गांधींच्या सांगण्यावरून लिहीले आहे असे संभवत नाही.
मुळात राजनाथसिंह यांच्या सारख्या ज्येष्ट नेत्यांनी हे जे विधान केले आहे, ते विधान मुळात सावरकरांनी ब्रिटीशांकडे माफी मागितली होती याची जाहीर कबुलीच आहे. आत्तापर्यंत भाजप विचारांचे लोक सावरकरांनी माफी पत्र लिहीले होते हेच नाकारत होते.
सावरकरांनी एकदा नव्हे तर अनेकदा अशी माफी पत्रे लिहीली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. उपलब्ध रेकॉर्डनुसार सावरकरांनी आत्तापर्यंत किमान चार माफी पत्रे ब्रिटीश सरकारकडे धाडली असून त्यातील तीन पत्रांमध्ये त्यांनी ब्रिटीशांना पुर्ण पाठिंबा देण्याचीही ग्वाही दिली आहे असे त्यांनी म्हटले आहे.