पुणे – करोना विषाणूमुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व उत्सव, सण, जत्रा रद्द केल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राजमुद्रा ग्रुप सुसगावच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक हजार जणांना अन्नवाटप केले. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी या कार्याची दखल घेतली असून कौतुक केले आहे.
करोना व्हायरसच्या राजमुद्रा ग्रुप सुसगावच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सलग ५ दिवस १ हजार लोकांना तयार अन्न वाटप करण्यात आले. या कार्याची दखल मुळशी मावळचे प्रांतअधिकारी संदेश शिर्के तसेच मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि मंडलाधिकारी नाईकवाडे यांनी घेतली.