मुंबई – गोडसेने गांधींना का मारले? भारतीय राजकारणात दोन विचारसरणींमध्ये हा प्रश्न सतत चालू असतो. या दोन्हही विचारसरणीवरचा आणखी एक चित्रपट चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटातून राजकुमार संतोषी तब्बल 9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे.या चित्रपटाच्या घोषणेनंतर आता ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामुळे चित्रपटाबाबतची उत्कंठा आणखी वाढली आहे.
तीन मिनिटे 10 सेकंदांच्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही भारताच्या त्या कालखंडात पोहोचाल, जिथे स्वातंत्र्यानंतरही फाळणीची परिस्थिती होती. नथुराम गोडसेने बापूंना म्हणजेच महात्मा गांधींना मारण्याचा निर्णय घेतल्याने अखेर काय झाले, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.या चित्रपटात दोन विचारांचे मोठे वाद,विवाद सर्वांसमोर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे गांधीजींना गोळी लागल्यानंतर देखील त्यांची आणि गोडसेची भेट झाली होती यामुळे मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. खरंच असं झालं होत का ? हे आता चित्रपटामध्येच उलगडणार असल्याचे समजते.
गुजराती चित्रपट दिग्दर्शक दीपक अँटनी या चित्रपटात महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. आणि नथुराम गोडसेची व्यक्तिरेखा मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी देखील या चित्रपटातून पदार्पण करताना दिसणार आहे.हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.विशेष म्हणजेच शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.