मध्यप्रदेश: निवडणूक प्रचारासाठी मध्यप्रदेश दौऱ्यावर असलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीव गांधींबाबत विधान केले आहे. “काँग्रेस सरकार असताना INS विराट या युद्धनौकेचा चुकीचा वापर करण्यात आला. राजीव गांधी आपल्या सासरकडच्या नातेवाईकांसोबत नौकेत फिरत होते. आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा एवढा चुकीचा वापर करणारे आज भाजप सरकारने केलेल्या सर्जिकवर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत आहेत”निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या, “राजीव गांधी यांनी INS विराट नौकेचा कसा वापर केला, ही माहिती खुली आहे. नौकेच्या चालकाने देखील हे मान्य केले आहे. आम्ही शहिद राजीव गांधींचा सन्मान करतो कारण त्यांचा मृत्यू एका आतंकवादी हल्ल्यात झाला होता. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारावर बोलणार नाही. दरम्यान, त्यांनी भोपाळ गैस प्रकरणावर देखील भाष्य केले. त्यावेळी राजीव गांधीच होते ज्यांनी एंडरसनला गेस्ट बनवून पळून जायला मदत केली”,असे त्या म्हणाल्या.