नवी दिल्ली – देशात पंचायत राज व्यवस्था आणून राजीव गांधी यांनी महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार केले असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त, राहुल गांधी यांनी रविवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पंचायत राज आणण्याचा प्रयत्नांचा गौरवपुर्ण उल्लेख करून सांगितले की, घटनेत 73 वी दुरूस्ती करून राजीव गांधींनी देशात पंचायत राज व्यवस्था लागू केली हा मोठा निर्णय होता.
देशातील गावे मजबूत व्हावीत हे महात्मा गांधींचे स्वप्न होते.राजीवजींनी ते स्वप्न साकार केले. या दिनानिमत्ती त्यांनी सर्व पंचायत संस्थांचे प्रमुख, सरपंच आणि सदस्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंचायत राज विधेयक हे देशाच्या सत्तेच्या विकेंद्रीकरणातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो.