माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी दोन दशकांहून अधिक काळ जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरनला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. तामिळनाडू सरकारने श्रीहरनच्या आजारी आईच्या याचिकेवर एक महिन्याचा पॅरोल मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गुरुवारी मद्रास उच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे. तामिळनाडू सरकारने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मद्रास उच्च न्यायालयाला कळवले होते की राज्याने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सातही दोषींची सुटका करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती.
Tamil Nadu: Nalini Sriharan, one of the convicts in Rajiv Gandhi assassination case, was granted a month’s parole by the State Govt at the request of her ailing mother, the Govt told Madras High Court on Thursday
(File photo) pic.twitter.com/NEuTP53SaB
— ANI (@ANI) December 24, 2021
या प्रकरणात नलिनी व्यतिरिक्त 6 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. दोषींमध्ये तिचा पती मुरुगन, सुथिनाथरा राजा उर्फ संथन, एजी पेरारिवलन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांचा समावेश आहे. श्रीहरन, संथन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार हे चार दोषी श्रीलंकेचे नागरिक आहेत.
जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत सर्व दोषी-
नलिनी आणि आणखी एका दोषीला वेल्लोरमधील महिला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. नलिनीने एकदा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हा तिच्या साथीदाराने तिला हे करताना पाहिले होते. याबाबत जेलरकडे तक्रार केली होती. राजीव गांधी यांच्या हत्येतील नलिनी आणि इतर दोषींना 21 मे 1991 रोजी टाडा न्यायालयाने या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, नंतर ते जन्मठेपेत बदलण्यात आले.