राजगुरूनगर (प्रतिनिधी): राजगुरूनगर शहरातील व राजगुरूनगर बाजार समितीत भाजीपाल्याचा आडतदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा संपर्कातील आडतदार, बाजार समितीमधील कर्मचारी, व्यापारी व शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. तालुक्यात 24 तासात तब्बल 30 जण पॉझिटिव्ह सापडल्याने करोनाचा धोका वाढत चालला आहे.
खेड तालुक्यात 24 तासात तब्बल 30 करोना बाधित व्यक्ती सापडल्याने तालुक्यात भितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत 8 जणांचे मृत्यू झाले असून 136 जण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात आळंदी 5, राजगुरुनगर 7, रासे 1, चाकण 1, नाणेकरवाडी 1, खालुंबरे 2, भोसे 1, वाकी बु 1, रोहकल 1, बिरदवडी 1, चिंबळी 1, कुरूळी 1, दावडी 2, खराबवाडी 5, असे 30 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
तालुक्यातील एकूण आकडेवारी पुढीलप्रमाणे-
बाधित व्यक्ती – 390
एकूण मृत्यू – 8
करोना मुक्त व्यक्ती- 136
उपचार सुरू असलेल्या व्यक्ती 246
24 तासात वाढलेले बाधित व्यक्ती- 30.
म्हाळुंगे कोविड सेंटर मधुन तपासणी केलेल्या १६८ व्यक्तिंचे करोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे उद्याच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची भीती आहे.