मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मराठा आरक्षण समाजाच्या मोर्चाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. मात्र यावेळी त्यांनी दोन्ही राजेंवर बोचरी टीका देखील केली. उदयनराजे यांच्यावर घणाघात करताना आंबेडकर यांनी त्यांचा नामोल्लेख टाळत एक राजा बिनडोक असल्याचं म्हंटलं होतं. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलंच कसं असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.
प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजेंना राज्यसभेवर घेतलं मात्र त्यांना कोणता पक्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील घेणार नाही.’ अशी जहरी टीका केली आहे. राणे यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये, त्यांची राजघराण्यावर बोलायची लायकी नाही असंही म्हंटल आहे.
पक्या परत ओकला… दोन ठिकाणी लोकसभेला उभा राहून सुद्धा जेम तेम फक्त डिपॉझिट वाचू शकला त्याची राजघराण्याबद्दल बोलायइतकी लायकी नाही. राजेंना राज्यसभेवर घेतलं पण पक्याला कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील कोणताही पक्ष घेणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 8, 2020
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
“दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, असे कुठे वाचनात आले नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण आरक्षणापेक्षा ते इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे मला दिसत आहे.”
“राज्य घटना ज्या माणसाला माहिती नाही. आरक्षण आम्हाला मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा, अशी भूमिका ते मांडतात. भाजपने त्यांना राज्यसभेवर कसे पाठवले?” असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.