जयपूर – करोना विषाणू संसर्ग रुग्णांची वाढती संख्या पाहता राजस्थान सरकारने पुन्हा एकदा आंतरराज्यीय सीमा बंद करण्याचा आदेश दिला आहे. आठ दिवसांसाठी राज्याच्या सीमा बंद करण्यात येणार आहे.
स्थलांतरित आणि इतर राज्यांतून येणाऱ्या लोकांमुळे करोनाचा प्रसार वेगाने होतो आहे. यामुळे आंतरराज्यीय सीमांवर चेक-पोस्ट सुरू करण्याचे आदेशात म्हटले आहे. वैध पासशिवाय कुणालाही राज्यात प्रवेश करू दिला जाणार नाही. याबरोबरच राज्यातून बाहेर जाणाऱ्यांनाही परवानगीशिवाय दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही.
आपत्कालीन परिस्थितीत किंवा कुणाचा मृत्यू झाला असल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या अटी व शर्तींचे पालन करूनच दुसऱ्या राज्यात जाण्यास अनुमती दिली जाणार आहे.