जयपूर : राजस्थान सरकारने सुधारीत नागरिकत्व कायद्या (का) विरोधात ठराव मंजूर केला.
राजस्थान सरकारने का कायद्याविरोधात शनिवारी ठराव मंजूर केला. त्यावर केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी टीका केली आहे. हा लोकशाहीचा खुन आहे. घटनेने विधानसभेला दिलेल्या अधिकाराचे हे उल्लंघन आहे, असे ते म्हणाले.
यापुर्वी केरळ आणि पंजाब विधानसभेने का कायद्याविरोधात टराव मंजूर केले आहेत. हा कायदा रद्द करावा अशी मागणी करणारा पहिला ठराव केरळ राज्याने मांडला होता.