जालोर – एकतर्फी प्रेमातून महिलेवर कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थान येथील जालोर येथे घडला आहे. या माधेफिरू युवकाने महिलेचा जीव जात नाही तोपर्यंत गळ्यावर कुऱ्हीडीने प्रहार सुरु ठेवले. त्यानंतर महिलेच्या मृदेहाला तासनतास या युवकाने कवटाळून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिस आल्यानंतर सुद्धा युवकाने मृदेहाला सोडले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला जबरदस्तीने मृतदेहापासून वेगळे केले.
ही घटना राजस्थानच्या जालोर अहोर परिसरातील घडली आहे. गणेश थानाराम मीणा असे आरोपीचे नाव असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. शांतिदेवी चौधरी असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याचे मनगेगा मध्ये काम करणारी महिला शांतिदेवी सोबत एकतर्फी प्रेम झाले होते. गणेश अनेक वेळा महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. घटनेच्या दिवशी महिला मनरेगामध्ये काम करत होती. यावेळी आरोपी गणेश आला व त्याने प्रेमाची विचारणा केली. त्यानंतर महिलेने गणेशच्या प्रेमास नकार दिला. नकार दिल्यामुळे आरोपीने महिलेवर कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली. यादरम्यान आज तुला मारून टाकणारअसे तो वारंवार ओरडत राहिला. महिलेच्या मानेवर, हातावर, खांद्यावर अनेक वार झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला तेव्हा गणेश तिच्या मृतदेहाला कवटाळून बसला.