मुंबई- हाथरस येथे घडलेल्या अमानुष प्रकारामुळे स्तरावरुन संताप व्यक्त केला जात आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून या भावना व्यक्त केल्या आहे.
‘उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे सारंच मन विषण्ण करणारं आहे, पण त्याहून भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणं हा आहे’, अशा शब्दांत राज यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
#HathrasHorror #संतापजनक pic.twitter.com/IZ2uWzbNEO
— Raj Thackeray (@RajThackeray) October 1, 2020
सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी या घटनेवर निवेदन जारी केलंं आहे. त्यात आता केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचं आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचं आवाहन केलं आहे.