मुंबई – उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला भेट देणार आहेत, परंतु भाजप खासदार ब्रिजभुषण यांनी आम्ही राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेऊ देणार नाही असे म्हटले आहे. सध्या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सध्या राजकीय वातावरण तापू लागलं आहे.
या यावरूनच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकरांशी बोलतांना जहरी टीका केली आहे. संजय राऊतांनी बृजभूषण सिंह यांचे कौतुक केले ते म्हणाले, ‘ उत्तर प्रदेशच्या लोकांची काही भावना असेल आणि त्यांचा उद्रेक एखादा नेता करत असेल, तर त्यांच्याशी आम्हाला संवाद साधावा लागेल. बृजभूषण लढवय्ये आहेत. त्यांचे-आमचे संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना प्रेमाने नेताजी म्हणतो. तो माणूस मागे हटणारा नाही.’
ते पुढे म्हणाले,’“राज ठाकरेंची नेहमीच भूमिका बदलत असते.’त्यांची एक पूर्वी एक भूमिका होती. ती त्यांनी का सोडली? मागील काही वर्षात उत्तर भारतीय, हिंदी भाषिकांच्या विरुद्ध त्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी काही भूमिका घेतली होती. पण एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत जायला निघाले.’ असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली.