मुंबई – अभिनेत्री सुलोचना लाटकर अर्थात ‘सुलोचना दीदी’ यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. वृद्धापकाळ आणि श्वसनाच्या आजारामुळे त्यांनी दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 94 वर्षांच्या होत्या. कला,क्रीडा साहित्य,राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सुलोचना दीदींसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरे यांनी सुलोचना दीदींच्या अभिनयाबाबत सांगत मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये त्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे. यावेळी ठाकरेंनी आपल्या ट्विटरवरून दीदींसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी
सुलोचना दीदींचं निधन झालं. ‘दीदी’ ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.
हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘आई’ हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण ‘आई’ पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या.
सुलोचना दिदींच्यात ‘आईपण’ हे अंगभूत होतं त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य.
एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी ‘आई’ होणे नाही, अशी ‘दीदी’ होणे नाही.
सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
सुलोचना दीदींचं निधन झालं. ‘दीदी’ ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.
हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या… pic.twitter.com/cIevAG9gLM
— Raj Thackeray (@RajThackeray) June 4, 2023
लोचना दीदींनी 1946 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, सुनील दत्त या अभिनेत्यांच्या आईची भूमिका त्यांनी साकारली आहे. सुलोचना दीदी यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने आणि 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे.