मुंबई: आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वताला मिस्टर क्लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते त्यावर राज ठाकरेंकडून टीका करण्यात आली आहे.
आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही.#RajivGandhi
— Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2019