मुंबई – शिंदे गटाने भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र अजूनही शिंदे सरकारवर न्यायालयाची टांगती तलवार आहे. अशात शिंदे गटातील आमदारांना एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागले तर त्यांच्यासमोर मनसेचा पर्याय असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यावर आता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सध्याची राजकीय परिस्थितीवर सडेतोडपणे भाष्य केलं असल्याचे समजते. “शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु”, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.तसेच “हे बंडखोर आमदार माझे जुने सहकारी आहेत, याआधी त्यांनी माझ्यासोबत काम केलेले आहे. मला याबद्दल तांत्रिक माहिती नाही. पण उद्या त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन,” असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी या मुलाखतीत व्यक्त केल्याचे समजते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या एकंदरीत राजकारणाबाबत राज ठाकरे यांनी आपले रोखठोक मत मुलाखतीत व्यक्त केल्याचे समजते. तसेच शिवसेनेतील त्यांची कारकीर्द ते शिवसेना सोडण्यापर्यंतच्या प्रवासाबबद्दल देखील ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले आहे.