मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी कोरोना या संसर्गाविषयी व त्या संदर्भात चालू असलेल्या घटनांसंदर्भात महाराष्ट्रातील व देशातील जनतेला उद्देशून आज पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी दिल्लीमधील निझामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज ठाकरे म्हणाले,’मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी. लोकांच्या अंगावर थुकतायत, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. नरेंद्र मोदींनी यावर बोलायला पाहिजे होतं असं म्हटलं आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘हे जे मुल्ला-मौलवी कुठे आहेत ते बघायचं आहे, निवडणुकीवेळी कुणाला मतदान करायचं सांगता, मग अशावेळी तुम्हाला सांगता येत नाही का? तसेच पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजे. यांची हात उचलायची हिंमत होते कशी ? पोलिसांना तुम्ही शिव्या देता ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. मी मुख्यमंत्र्यांना यावर कडक पावलं उचलली पाहिजे अशी विनंती केली आहे अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.